Monday, June 23, 2025

murder :इचलकरंजी येथील खोतवाडी येथे युवकाचा खून : तिघांवर गुन्हा

इचलकरंजी : खोतवाडी येथे आरोही बार जवळ तारदाळ येथील जावाईवाडी परिसरातील मयुर दिपक कांबळे ( वय 25 ) या युवकाचा तिघा युवकांनी धारधार शस्त्रांनी सपा सप वार करून निर्घण खुन (murder) केला. ही घटना शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी रात्री उशिरा शहापूर पोलिसांनी विनायक संभाजी चौगुले,अं कुश निलेश माने, व रेहान रमजान मुजावर या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

इचलकरंजी शहालगत असणाऱ्या खोतवाडी गावामध्ये मयूर दीपक कांबळे या युवकाचा आहे. मयुर कांबळे हा तारदाळ येथील जावईवाडी मध्ये राहण्यास आहे. तो हमालीची काम करत होता. मयूर व त्याचा मित्र चव्हाण या दोघांमध्ये गेल्या काही दिवसापासून वादावादीचे प्रकार घडत होते.

गेल्या काही दिवसांमध्ये या दोघांमध्ये मोठा वादही झाला होता. तर शेजाऱ्यांनी व त्याच्या मित्रांनी हा वाद मिटवला होता. पण पुन्हा काल सकाळी वादाचे रुपांतर घडले पुन्हा दोघांची भांडणे मिटवण्यात आली.त्यातच तारदाळ येथीलच चार युवक एका बार मध्ये दारू पिण्यासाठी बसले होते. यावेळी पुर्वीच्या अनैतिक संबंधातून झालेल्या वादाचा राग उफाळून आल्याने जोरदार वादावादी झाली. यावेळी मारेकऱ्यांनी तलवारी सारख्या धारदार शस्त्रांनी (murder) मयुरला गाठून हल्ला चढवला.

तसेच मयुर खाली कोसळल्याने मारेकऱ्यांनी दगड घेवून डोक्याचा अक्षरशः चेदां मेंदा केला. त्यामुळे तो जागीच मृत झाला. घटनास्थळी शहापूर पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला असून उपविभागीय अधिकारी समीरसिंह साळवे यांनी घटनास्थळी भेट दिली इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर मयूरच्या मित्रमंडळी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म