पेटीएम पेमेंट(UPI) बँकेबाबत आरबीआयच्या निर्णयानंतर सातत्याने बातम्या येत आहेत. तथापि, कंपनीने स्पष्ट केले आहे की ते UPI पेमेंट ब्लॉक करत नाहीत. आता यानंतर सरकारसमोर अनेक आव्हाने आहेत. कारण आता अनेक ॲप उपलब्ध आहेत आणि त्याचा थेट फायदा युजर्सना होणार आहे.
काही काळापूर्वी एक अहवाल आला होता. असे नोंदवले गेले की यामुळे Google Pay आणि फोन पे वापरकर्त्यांच्या बाबतीत 15-20% वाढ होऊ शकते. देशातील UPI मार्केटही वेगाने वाढत आहे. अशावेळी सरकारचा सर्वाधिक भर भारतीय ॲप्सवर असेल. बाजारात अनेक ॲप उपलब्ध आहेत जे भारतीय आहेत, पण त्यांचा वापर कमी आहे. तसे झाल्यास ‘मेक इन इंडिया’लाही बळ मिळेल.
सध्या देशात सर्वाधिक वापरकर्ते Phone Pay चे आहेत. त्यानंतर Google Pay चा क्रमांक लागतो. तर भारतीय ॲप BHIM UPI याबाबतीत सर्वात पिछाडीवर आहे. केंद्र सरकारसाठी हे फार मोठे आव्हान आहे. दिव्याखाली अंधार असा हा प्रकार आहे. आता BHIM UPI ने पण ऑफरचा वर्षाव केला आहे. या ॲपमध्ये पण अनेक बदल करण्यात आले आहे. ते युझर्स फ्रेंडली करण्यावर जोर देण्यात येत आहे.
UPI हा सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. त्यात BHIM या स्वदेशी ॲपला आघाडी घेता आली नाही. ते पिछाडीवर पडले. पेटीएमच्या कारनाम्यामुळे आता सरकारने देशी ॲपला प्राधान्य देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याचे समजते. त्यासाठी ‘Make In India’ वर जोर देण्यात येणार आहे. भीम युपीआयवर पण मोठ्या ऑफर्स देण्यात येतील. तसेच काही धोरणात्मक बदल करुन या ॲपला पुढे आणण्यात येईल. BHIM App चे युझर वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.