Wednesday, June 25, 2025

Rashi : 31 दिवसात 5 ग्रह बदलणार चाल; 4 राशी भाग्यवान! पैसा, प्रेम सारंकाही मिळणार

ज्योतिषशास्त्रात सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी, राहू आणि केतू या नवग्रहांना प्रचंड महत्त्व आहे. हे ग्रह वेळोवेळी रास (Rashi) बदलतात. काही दिवस त्यांचा मुक्काम एका राशीत असतो, तर काही दिवस दुसऱ्या राशीत.या ग्रहांचा आणि त्यांच्या चालबदलाचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो.

अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, मार्च महिना ग्रह-नक्षत्रांच्या दृष्टीने विशेष असणार आहे. कारण या महिन्यात पाच ग्रहांची स्थिती बदलेल. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होईल. त्यातून काही राशींच्या वाट्याला सुख येईल.

5 ग्रह चाल बदलणार!

31 दिवसांच्या या महिन्यात 5 ग्रहांची चाल बदलणार आहे. बुध, शुक्र, सूर्य आणि मंगळ ग्रहाचा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश होईल. तर, याच महिन्यात कुंभ राशीत (Rashi) शनीची उदय अवस्था सुरू होईल. दरम्यान, 7 मार्चला शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. 14 मार्चला सूर्याचा मीनप्रवेश होईल. त्याच्याच पुढच्या दिवशी म्हणजे 15 मार्चला मंगळ ग्रह कुंभ राशीत जाईल. त्यानंतर शनी आणि बुध अस्त अवस्थेतून उदय अवस्थेत येतील. तर, 26 मार्चला मेष राशीत बुध ग्रहाचा प्रवेश होईल. त्यानंतर महिन्याच्या शेवटी 31 मार्चला शुक्र मीन राशीत जाईल.

‘या’ राशीच्या व्यक्तींचा फायदा!

ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्क, वृषभ, मेष आणि कन्या राशीच्या व्यक्तींसाठी मार्च महिना अत्यंत भाग्याचा असणार आहे. याच महिन्यात आपलं प्रमोशन होऊ शकतं, आपली आर्थिक स्थिती (Rashi) भक्कम होईल, थांबलेली सर्व कामं पूर्ण होतील, कोणाच्या प्रेमात असाल तर वाट्याला सुखाचे क्षण येतील, करियरमध्येही प्रगती होईल.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. स्मार्ट इंडिया  त्याची हमी देत नाही.)

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म