कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात होणाऱ्या किरणोत्सव सोहळ्याबद्दल सर्वच भाविकांना कुतूहल आणि आकर्षण (Attraction) असते. दरवर्षी सूर्याच्या दक्षिणायन आणि उत्तरायण कालखंडात अशा दोन वेळेला हा किरणोत्सव सोहळा होत असतो. या काळात पाच दिवस हा अप्रतिम सोहळा सुरू असतो. पण दुर्दैवाने अनेकदा किरणोत्सव सोहळा अडथळ्यांच्या शर्यतीत अडकतो. त्यामुळे बऱ्याचदा भाविकांच्या पदरी निराशा पडते.
अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवात दोन प्रकारच्या अडथळे येतात एक म्हणजे नैसर्गिक आणि दुसरे म्हणजे मानवनिर्मित अडथळे. मानव निर्मित अडथळ्यांमध्ये सूर्यकिरणे आणि देवीची मुर्ती यांच्या मार्गात येणाऱ्या इमारती, बाल्कनी, जिना या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश होतो. कित्येक वर्षांपासून हे अडथळे बाजूला करण्याचे प्रयत्न पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केले आहेत.
वेळोवेळी नागरिकांनी समितीला सहकार्य केले आहे. पण तरी देखील सर्व अडथळे बाजूला झालेले नाहीत. किरणोत्सव मार्गातील मोठे अडथळे बाजूला झाले तर अजून चांगल्या (Attraction) प्रकारे होऊ शकतो, अशी शक्यता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी व्यक्त केली.
हे वाचा : थंडी वाढणार; अनेक भागांना पावसाचा इशारा…
अंबाबाई किरणोत्सव मार्गात मानवनिर्मित अडथळ्यांच्या बरोबरच नैसर्गिक अडथळ्यांचा देखील समावेश आहे. यामध्ये खगोलीय घटना म्हणजेच वादळ, जोरदार वारे यांचा समावेश आहे. जमिनीवरील झाडांच्या फांद्या, ढगाळ वातावरण, किरणांची तीव्रता, किरणोत्सवावेळी मंदिरात असणारी आर्द्रता याचा देखील परिणाम किरणोत्सवावर होतो अशी माहिती या विषयाचे अभ्यासक आणि विवेकानंद महाविद्यालयातील खगोलशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर यांनी दिली आहे.
अंबाबाईचा किरणोत्सव (Attraction) हा बऱ्याच जणांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडत असतो. पण या अडथळ्यांमुळे सर्वच भाविकांच्या आनंदावर विरजण पडते. त्यामुळे हे अडथळे दूर होऊन किरणोत्सव व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी देवस्थान समिती कधी पूर्ण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.