Monday, June 23, 2025

movie : धर्मवीर’ चित्रपटाच्या पुढच्या भागाच्या शूटिंगला सुरुवात?

अभिनेता प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट (movie) प्रदर्शित होऊन काही महिने उलटले असले तरी चित्रपटाची क्रेझ मात्र कायम आहे. या चित्रपटाची, त्यातील डायलॉगची चर्चा सोशल मीडियावर कायमच सुरु असते. प्रसाद ओकचा ‘धर्मवीर’ चित्रपट आणि त्यातील आनंद दिघे यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.

त्याची ही भूमिका प्रचंड गाजली होती. प्रसाद ओक आनंद दिघेंची भूमिका अक्षरशः जगला असं म्हणणं वावगं ठरणार नाही.  ठाण्याचे शिवसेना नेते आनंद दिघे यांच्यावर आधारित या चित्रपटाची निर्मिती मंगेश देसाई यांनी  केली होती. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हाच याचा दुसरा भाग येणार अशी घोषणा केली गेली होती. मात्र आता या दुसऱ्या भागाची तयारी सुरु झाल्याचे संकेत मिळाले आहेत.

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’  या चित्रपटाचे (movie) सर्वेसर्वा लेखक, दिगदर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता प्रसाद ओकने खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने धर्मवीरच्या शुटिंगदरम्यानचा या दोघांचा एक फोटो शेअर करत लिहिलंय कि, ”प्रिय प्रविण… वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा…!!! माझ्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर आलेलं हे प्रसन्न हास्य कायम ठेवण्याचा प्रयत्न मी #धर्मवीर च्या पुढच्या भागातही करेन अशी खात्री देतो.

हे वाचा : कधी संपणार अंबाबाई मंदिराच्या किरणोत्सवातील अडथळ्यांची मालिका?

तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत आणि तुझ्या सर्व कलाकृतींना भरघोस यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!!!”मात्र आता प्रसाद ओकने शेअर केलेल्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता मात्र वाढली आहे. आता ‘धर्मवीर’ चा पुढचा भाग नक्की येणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पण हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल याविषयी मात्र अजून काही माहिती समोर आलेली नाही.

धर्मवीर चित्रपटात (movie) सर्वात शेवटी  आनंद दिघे यांचा अपघात होते आणि नंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो असे दाखवण्यात आले आहे. परंतु शेवटी एक पत्रकार ज्यांची भूमिका खुद्द निर्माते मंगेश देसाई यांनी केली आहे,ते दिघे यांच्या मुत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. आनंद दिघे सात वाजेपर्यंत ठीक होते, सगळ्यांशी बोलत होते, हसत होते आणि अचानक गेले ?’ असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालू लागतो.

या वाक्यानंतर दिग्दर्शक प्रवीण तरडे दिघे यांची कथा अद्याप संपलेली नाही दिघे परत भेटीला येणार असे सांगतात.तेव्हापासून आता पुढच्या भागात नेमकं काय पाहायला मिळणार, दिघेंच्या मृत्यूचं गूढ कसं उलगडणार हे पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म