भारत आणि श्रीलंकेपर्यंत कथित रामसेतू (history) उभारण्यात आल्याचं आपण आत्तापर्यंत अनेक कथांमधून व पुरणांमधून ऐकत आलो आहोत. राज्यसभेत झालेल्या चर्चेत केंद्र सरकारने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. राम सेतूच्या अस्तित्वाचे स्पष्ट पुरावे अद्याप सापडले नाहीत, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. सरकारयावर सातत्याने काम करत आहे, असंही राज्यसभेत केंद्राकडून सांगण्यात आलं.
हरियाणाचे अपक्ष खासदार कार्तिकेय शर्मा यांनी राज्यसभेत भारताच्या इतिहासाबाबत प्रश्न केला होता. त्यावर उत्तर देताना केंद्र सरकारने ही माहिती दिली आहे. भारत सरकार आपला गौरवशाली इतिहासासाठी वैज्ञानिक संशोधन करतय का? कारण मागील सरकारमध्ये या मुद्द्याला महत्त्वाचं दिलं नाही, असा सवाल कार्तिकेय शर्मा यांनी केला होता. यावर केंद्रीय मंत्री जितेंद्र शर्मा यांनी उत्तर दिलं होतं.
हे वाचा : जाणून घ्या आजचे राशी भविष्य दि : 24-12-22
ते म्हणाले, अद्याप रामसेतूच्या (history) अस्तित्वाच्या कोणत्याही स्पष्ट खुणा सापडल्या नाहीये. तसंच, सरकार सातत्याने प्राचीन द्वारका आणि अशा प्रकारणात संशोधन करत आहे.संसदेत खासदाराने रामसेतूच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला याचा मला आनंद आहे. पण आपण ज्या रामसेतूबद्दल बोलतोय त्याला १८,००० वर्षांचा इतिहास आहे. अशा परिस्थितीत संशोधन करताता काही मर्यादा आहेत.
रामसेतू ५६ किलोमीटर रुंदीला होता. स्पेस टेक्नोलॉजीमार्फत शोध घेतला असता त्यावेळी समुद्रात काही दगड दिसून आले. त्या दगडांची एक आकृती आहे. त्यात सातत्य आहे. तसंच, समुद्रात काही बेटे आणि चुनखडीसारख्या गोष्टीही सापडल्या आहेत. त्यामुळं रामसेतूचं खरं रुप तिथे आहे की नाही, हे सांगणं कठीण आहे. तिथे काही अशी चिन्ह आहेत ज्यावरुन त्याठिकाणी एखादी रचना अस्तित्वात असू शकते, हे सुचित करतात, असं जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.
भारतातील रामेश्वरम (history) आणि मन्नार बेटाच्यामध्ये चुनखडी आणि खडकांची एक साखळी आहे. या पुलाची लांबी जवळपास ३० मैल म्हणजेच ४८ किमीपर्यंत आहे. या परिसरात समुद्र उथळ आहे. त्यामुळं इथे मोठी जहाजे आणि बोटी चालवण्यात अडचणी येतात. अनेक पौराणिक कथेत असा दावा करण्यात आला आहे की, भगवान रामाने रावणाच्या कैदेतून सीतेला मुक्त करण्यासाठी या पुलाचे निर्माण केले. १९९३मध्ये नासाने सॅटेलाइटचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. त्यावेळी हा मानवनिर्मित पूल असल्याचे म्हटलं गेलं होत