इंदौरच्या होळकर स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज तिसरा कसोटी (Cricket) सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.
अशात तिसरा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ यावर्षीची ही बॉर्डर- गावसकर ट्रॉफी आपल्या नावावर करू शकतो. याशिवाय, या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली खास विक्रमाला गवसणी घालणार आहे.विराट कोहलीने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.त्याने ५८.२२ च्या स्ट्राईक रेटने एकूण १० हजार ८२९ धावा केल्या आहेत. ज्यात ३४ शतक आणि ५१ अर्धशतक झळकावली आहेत.
दरम्यान, २५४ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. विराटने आतापर्यंत मायदेशात १९९ सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व (Cricket) केले आहे. आस्ट्रेलियाविरुद्धचा तिसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली मायदेशातील २००वा आंतरराष्ट्रीय खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
हे वाचा : Jio चा एक रिचार्ज आणि Netflix आणि Amazon Prime सोबतच, पाहा काय खास ऑफर
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. यामुळे तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेवर कब्जा करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. तर, या सामन्यातून ऑस्ट्रेलिया संघाला कमबॅक करण्याची एकुलती एक संधी असेल.