इचलकरंजी शहरात प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अपुरा व अनियमित (Water shortage) पाण्याची बोंब सुरु असतानाच सार्वजनिक कुपनलिकांचा वाढत चाललेला गैरवापर मोठी डोकेदुखी ठरत आहे. यातून आधीच पाणी टंचाईची झळ त्यात आता पाण्याचा होत असलेला अपव्यय नियोजनशून्य कारभार चव्हाट्यावर आणणारा ठरत आहे.
त्यामुळे कुपनलिकांचा गैरवापर व पाण्याचा होणारा अपव्यय रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने वेळीच ठोस पावले उचलून कार्यवाही करावी, अन्यथा भविष्यात पाण्याचा प्रश्न अधिक चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.इचलकरंजी शहराला स्वच्छ, नियमित व मुबलक पाणी पुरवठा होणार हा कळीचा मुद्दा अगदी लोकसभा, विधानसभा व नगरपालिका निवडणुकीत प्रत्येक राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात असतो.
आजपर्यंतच्या कित्येक निवडणुका केवळ याच महत्वाच्या मुद्यावर लढवून अनेकांनी जिंकल्या देखील आहेत. पण, शहराचा ज्वलंत पाणी प्रश्न (Water shortage) माञ अजूनही जैसे थे स्थितीतच आहे, हे वास्तव कुणीही नाकारु शकत नाही.इचलकरंजी शहराला पंचगंगा नदी व कृष्णा नदीतून पाणी पुरवठा केला जातो.
पण, पंचगंगा नदीतील दुषित पाणी व कृष्णा पाणी योजनेला लागणारी वारंवार गळती, या कारणांमुळे इचलकरंजी शहराला अपुरा व अनियमित पाणी पुरवठा ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. त्यामुळे शहराला चार – पाच तर कधी कधी आठ दिवसांतून होणारा अपुरा पाणी पुरवठा प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा उत्कृष्ट नमुना ठरत आहे. त्यात आता प्रस्तावित सुळकूड योजना देखील दूधगंगा नदीकाठच्या गावांच्या वाढत्या विरोधामुळे चांगलीच वादात सापडली आहे.
त्यामुळे शहराला नियमित भेडसावणारी पाणी टंचाईची समस्या दूर होण्याची आशा काहीशी अंधुक बनत चालली आहे. आता कुठे उन्हाळा सुरु होत असतानाच अनियमित व अपुरा पाणी पुरवठ्याचा प्रश्न (Water shortage) अधिक भेडसावत आहे. या समस्येचे पडसाद शहरातील विविध प्रभागात संतप्त नागरिकांकडून होत असलेला रास्ता रोको, नेतेमंडळी व अधिका-यांना घेराव, पालिकेवर मोर्चा यातून उमटत आहेत. यात महापालिकेचे अधिकारी पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यापलीकडे काहीच हालचाल करत नसल्याचे दिसत आहे.
एकीकडे शहरात पाणी प्रश्न अधिक गंभीर बनत असताना महापालिका प्रशासनाने पाणी पुरवठ्याचे चांगले नियोजन करण्याची गरज असतानाच दुसरीकडे विविध प्रभागात सार्वजनिक कुपनलिकांना तोटी नसल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असून कुपनलिकांचा गैरवापरही वाढला आहे.
ही गंभीर बाब प्रशासनाच्या निदर्शनास का येत नाही किंवा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते का, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे कुपनलिकांचा गैरवापर व पाण्याचा (Water shortage) अपव्यय रोखण्यासाठीमहापालिका प्रशासनाने वेळीच ठोस पावले उचलून कार्यवाही करावी, भविष्यात पाण्याचा प्रश्न अधिक चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.