Reliance Jio ने बुधवारी १५ मार्च रोजी देशातील आणखी ३४ शहरात आपली हाय स्पीड Jio True 5G Network सर्विस सुरू केली आहे. आता देशातील एकूण ३६५ शहरात ५जी सर्विस पोहोचली आहे. जिओच्या दाव्यानुसार ज्या ३४ नवीन शहरात 4जी सर्विस उपलब्ध करण्यात आली आहे.
त्या ठिकाणी ५जी सर्विस देणारे जिओ पहिले टेलिकॉम ऑपरेटर आहे. भारतात १ ऑक्टोबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्त 4जी सर्विस लाँच करण्यात आली होती. २०२३ च्या अखेरपर्यंत संपूर्ण देशात ५जी सर्विस पोहोचण्याचे जिओचे लक्ष्य आहे. महाराष्ट्रातील कोणकोणत्या शहरात जिओची ५ जी सर्विस पोहोचली आहे,
जाणून घ्या संपूर्ण लिस्ट या शहरात पोहोचले Jio True 5G Network
जिओ टू 5जी शी नवीन शहराच्या जोडलेल्या यादीत आंध्र प्रदेश मधील अमलापुरम धर्मावरम कवाली, तनुकु तुनी, विनुकोंडा, हरियाणाच्या भिवानी, जींद कैथल, रेवाड़ी, हिमाचल प्रदेशच्या धर्मशाला, कांगड़ा, जम्मू आणि कश्मीरच्या बारामूला, कठुआ, कटरा, सोपोर कर्नाटकच्या हावेरी, कारवार, रानीबेन्नूर, केरल च्या अत्तिंगल, मेघालयच्या तुरा, ओडिशाच्या भवानीपटना, जटानी, खोरधा सुंदरगढ़, तमिलनाडूच्या अम्बुर, चिदंबरम, नमक्कल, पुदुक्कोट्टई, रामनाथपुरम, शिवकाशी, तिरुचेंगोडे, विलुप्पुरम आणि तेलंगानाच्या सूर्यापेट या शहराचा समावेश आहे.
हे वाचा : इचलकरंजी रात्री अचानक आवकाळी पावसाची हजेरी
महाराष्ट्रातील या शहरात पोहोचली 5जी सर्विस
सातारा, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड-वाघाला,नाशिक, पुणे, सांगली, अकोला, परभणी, अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, जळगाव आणि सोलापूर या शहराचाप्रामुख्याने समावेश आहे.
लॉचिंग वेळी जिओच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, नवीन ३४ शहरात जिओ 4जी टू ५जी रोलआउट करण्यात आल्याने आम्हाला गर्व आहे. जिओचे इंजिनिअर प्रत्येक भारतीय पर्यंत टू ५जी (5G Network) पोहोचण्यासाठी २४ तास काम करीत आहेत. डिसेंबर २०२३ पर्यंत प्रत्येक शहर, प्रत्येक तालुक्यात आपली जिओ 4 जी सर्विस लॉंच केली जाणार आहे. या शहरात जिओ यूजर्सला जिओ वेलकम ऑफर अंतर्गत इनवाइट केले जाईल. तसेत कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय, १ जीबीपीएस प्लस स्पीड आणि अनलिमिटेड डेटा दिला जाईल.