Sunday, June 22, 2025

manoj jarange patil :देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानंतर मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं ‘हे’ आवाहन, म्हणाले…

manoj jarange patil :देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानंतर मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं ‘हे’ आवाहन, म्हणाले…

मराठा आरक्षण न्यायालयात गेलं तरी टिकेल, असा विश्वास मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी व्यक्त केला.मावळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत असताना जरांगे पाटील म्हणाले की, सरकार आणि कायदेतज्ज्ञांनी आरक्षणासाठी कठोर मेहनत केली आहे. त्यामुळे न्यायालयातही आरक्षणाचा कायदा टिकेल.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरून देखील मराठा समाजाला घाबरून जाण्याची गरज नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.आरक्षणाचा कायदा ७० वर्षांचा आहे आणि तो सरसकट रद्द होणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.

हे वाचा :  “फेब्रुवारीत सूर्य, मंगळ आणि इतर 2 ग्रहांच्या राशी बदलामुळे, हे या राशींना मिळणार प्रचंड धनसंपत्ती..”

मराठा आरक्षण हे खेचून आणलेले आहे आणि हा विजय अवघ्या मराठा समाजाचा आहे, असे जरांगे पाटील (manoj jarange patil)  म्हणाले.मराठा समाज पाच महिन्यांच्या संघर्षानंतर आरक्षण मिळवू शकला आहे. या आरक्षणाची अंमलबजावणी व्हायला हवी आणि ज्यांना प्रमाणपत्र मिळाले आहे त्यांच्यापर्यंत ते लवकरात लवकर पोहोचले पाहिजे, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.

 

 

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म