Monday, June 23, 2025

मृत्यूचं तांडव! विहीर कोसळून 35 जणांनी गमावला जीव

राम नवमीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा होत असतानाच त्याला गालबोट लागलं आहे. एक भयंकर घटना (accident) घडली. पूजेसाठी आलेल्या भाविकांवर काळाने घात केला. कन्यापूजा सुरू असताना विहीर कोसळली. ही विहीर मंदिर परिसरातील आहे. तिथे पूजेसाठी भाविक आले असताना ही दुर्घटना घडली.

या विहिरीत 50 हून अधिक बुडल्याची माहिती मिळाली आहे. त्यापैकी 35 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ANI ने दिली आहे. तर स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 35 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन विभाग, पोलीस जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत 15 हून अधिक मृतदेह हाती लागले. मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोकाकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

हे वाचा : आयफोन विकत घेण्यासाठी कर्ज देणार Apple, इतक्या हप्त्यात चुकवा रक्कम, चेक करा

ही धक्कादायक घटना (accident) मध्य प्रदेशातील इंदौर इथे पटेल नगर परिसरात श्री बेलेश्वर महादेव झूलेलाल मंदिरात घडली आहे. या मंदिरात राम नवमीनिमित्तानं होम आणि कन्या पूजेचं आयोजन करण्या आलं होतं.मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांना 5 लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. अपघाताची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत.

अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक काय झाले ते कोणालाच समजलं नाही. तरीही स्थानिक लोकांनी पुढे येऊन मदत करायला सुरुवात केली. त्यांनी 10 जणांना बाहेर काढलं. जखमींना ऍपल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे.

 

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म