देशात कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत आणि गुरुवारीही ही आकडेवारी वाढली. गेल्या 24 तासांत देशात कोविड-19 चे 7 हजार नवीन रुग्ण (Patient) आढळले आहेत. दरम्यान, सर्वोत्तम आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं की, जोपर्यंत या व्हायरसचा नवीन व्हेरिएंट सापडत नाही तोपर्यंत कोरोनाची चौथी लाट भारतात येणार नाही.
ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना डॉ रोमेल टिक्कू म्हणाले की, कोविड-19 चे नवीन व्हेरिएंट सापडत नाही तोपर्यंत देशात कोरोनाची चौथी लाट येण्याची चिन्हे दिसत नाहीत जी आधीच्या प्रकारांपेक्षा वेगळी आहे. त्यांनी सांगितले की लोक आता एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवास करत आहेत आणि जीवन पूर्वपदावर येत आहे, त्यामुळे कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत.
डॉ. टिक्कू यांच्या म्हणण्यानुसार, देशात पर्यटनाशी संबंधित क्रियाकलाप वाढल्यामुळे कोविड-19 ची प्रकरणे वाढली आहेत. कारण लोक जागोजागी फिरत असतात. मात्र, ते म्हणाले की, कोरोना महामारी आता स्थानिक आजार होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे कोरोनाचा मोठा स्फोट होण्याची शक्यता नाही.
पुढे डॉ. टिक्कू सांगतात की, जोपर्यंत कोविड-19 साथीचा संसर्ग थांबत नाही, तोपर्यंत खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोणतीही सामान्य लक्षणे नसल्यास आणि जास्त समस्या नसल्यास, ही प्रकरणे न्यूमोनिया म्हणून पहावी लागतील. यासाठी आपण जास्त काळजी करू नये. पण मी म्हटल्याप्रमाणे, हा आजार बराच काळ आपल्यासोबत राहणार आहे, त्यामुळे सावधगिरी आणि दक्षता हाच यापासून बचाव करण्याचा एकमेव मार्ग आहे.
भारतात गुरुवारी कोरोनाचे 7240 रुग्ण (Patient) आढळले आहेत, जे आदल्या दिवसाच्या तुलनेत 40 टक्क्यांनी जास्त आहेत. महाराष्ट्र आणि केरळ या देशातील दोन राज्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. या वर्षी 2 मार्चनंतर बुधवारी दैनंदिन केसेसमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.
राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत वाढ, चौथी लाट येणार का?
रुग्णसंख्येत गेल्या वेळप्रमाणेच महाराष्ट्र आघाडीवर असून, राज्यात 2701 नव्या रुग्णांची नोंद एका दिवसात झाली आहे. हा गेल्या चार महिन्यांतला उच्चांक आहे; मात्र या रुग्णसंख्येचं बारकाईने विश्लेषण केल्यास असं लक्षात येतं, की यातले बहुतांश रुग्ण (Patient) लक्षणं नसलेले आहेत. तसंच, कोविड-19 झालेले रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही 98 टक्के आहे. दुसऱ्या लाटेत मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक होतं. त्या तुलनेत आत्ताची स्थिती खूपच दिलासादायक आहे.
बुधवारी (8 जून) मुंबईत कोविड-19चे 1765 नवे रुग्ण आढळले, तर एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. 26 जानेवारीनंतर एका दिवसातली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. या 1765पैकी 1682 रुग्ण लक्षणं नसलेले आहेत. लक्षणं असलेले अन्य 83 रुग्ण हॉस्पिटलमध्ये असून, त्यापैकी 11 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांसाठी 24,598 बेड्स उपलब्ध असून, त्यापैकी 293 बेड्सवर सध्या रुग्ण उपचार (Health ) घेत आहेत.
पुण्यात (Pune) ओपीडीमध्ये येणाऱ्या पेशंट्समध्ये 5-10 टक्के वाढ नोंदवली गेल्याचं तिथल्या हॉस्पिटल्सचं म्हणणं आहे; मात्र त्यापैकी बहुतांश रुग्ण (Patient) लक्षणं नसलेलेच असल्याचं डॉक्टर्सनी सांगितलं. तसंच, बहुतांश रुग्णांना ताप येण्याचा कालावधी कमी असून, तो जास्तीत जास्त 48 ते 72 तासांपर्यंतचाच असल्याचं निरीक्षण आत्ता नोंदवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे बहुतांश जणांना श्वसन संस्थेच्या वरच्या भागातली म्हणजेच घसा खवखवणं, नाक चोंदणं आणि कफ अशी लक्षणं दिसत आहे. बहुतांश पेशंट्सना कोविड-19ची सौम्य लक्षणं दिसत असून, ते घरच्या घरीच बरे होत आहेत.