Saturday, June 21, 2025

गोड पदार्थ काही काळ तुम्हाला Stress free करतात; पण मानसिक आरोग्यावर होतो असा परिणाम

आपल्या देशात आनंद साजरा करणे म्हणजे काहीतरी गोड-धोड खाणे हे ठरलेलेच असते. एवढेच नाही तर जेव्हा आपण अस्वस्थ होतो किंवा मानसिक  थकवा (Stress free) जाणवतो, तेव्हाही गोड पदार्थ आपल्याला खायला आवडतात. बऱ्याच लोकांना गोड पदार्थ  खाल्यानंतर बरे वाटते आणि तणाव दूर करण्यासाठी चॉकलेट किंवा मिठाई खाल्ली जाते.

खरं तर गोडवा आणि आपला मेंदू जवळचा संबंध आहे. हेल्थ शॉट्मध्ये दिलेल्या माहितीनुसार, संशोधनात असे आढळले गेले आहे की, गोड पदार्थ आपल्याला काही काळ तणावापासून दूर नेऊ शकतात. पण त्यांचे आपल्या मानसिक आरोग्यावर (Mental Health) दूरगामी वाईट परिणाम होऊ शकतात.

मूड आणि गोडपणा

जर तुम्ही जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केले तर मूड डिसऑर्डर होण्याची शक्यता वाढू शकते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या 2019 च्या संशोधनात असे आढळून आले की संतृप्त चरबी आणि जोडलेले स्वीटनर्स, जर नियमित सेवन केले तर 60 वर्षांवरील प्रौढांमध्ये समस्या उद्भवू शकतात.

नैराश्याचे कारण बनू शकते

जेव्हा संशोधनात उदासीनता आणि साखरेचा उच्च आहार यांच्यातील संबंध आढळला, तेव्हा असे आढळून आले की जास्त साखरेचा वापर विशिष्ट मेंदूच्या रसायनांमध्ये असंतुलन निर्माण करतो. ज्यामुळे असंतुलन उदासीनतेस कारणीभूत ठरू शकते. ही उदासीनता काही लोकांमध्ये मानसिक आरोग्य विकारांचा धोका देखील वाढवू शकते. आणखी एका अभ्यासात असे आढळून आले की, ज्या लोकांनी जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केले त्यांना पुढील 5 वर्षात क्लिनिकल​नैराश्य येण्याची शक्यता 23 टक्के जास्त आहे.

म्हणूनच गोड खाल्ल्याने मानसिक आराम मिळतो

खरं तर, जेव्हा आपण गोड पदार्थ खातो, तेव्हा मेंदूतील हायपोथालेमिक पिट्यूटरी अॅड्रेनलवर दबाव पडतो आणि तुमचा थकवा (Stress free) कमी होतो. ज्यामुळे काही काळ तणाव नियंत्रित राहतो. कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांना आढळले की, साखरेमुळे तणाव-प्रेरित कोर्टिसोल स्राव प्रतिबंधित होतो आणि निरोगी सहभागींमध्ये चिंता आणि तणावाची भावना कमी होते. कोर्टिसोलला स्ट्रेस हार्मोन म्हणून ओळखले जाते. अशा परिस्थितीत, जेव्हा गोड पदार्थ खाण्याची सवय बनते, तेव्हा ते इतर रोग, लठ्ठपणा इत्यादींचे कारण बनते.

कोकेनपेक्षा साखरेचे व्यसन

हेल्थ लाइननुसार, संशोधनात असे आढळून आले आहे की, कोकेनपेक्षा साखरेचे व्यसन लोकांना अधिक चांगले वाटू शकते. यामुळे मनाला त्वरित आराम मिळतो.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म