Sunday, June 22, 2025

Rain इचलकरंजी रात्री अचानक आवकाळी पावसाची हजेरी

इचलकरंजी काल रात्री अचानक पाऊस (Rain) सुरू झाल्याने वातावरणात बदल झाला व सगळीकडे कारवा निर्माण झाला रात्री तीनच्या दरम्यान हा पाऊस सुरू झाला व साडेचार वाजता पाऊस कमी झाला आता नागरिकांना दुपारची भीती वाटत आहे दुपारी वातावरणात बदल होतो की काय असे नागरिकांच्या बोलण्यातून दिसत आहे काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होता व काही भागात खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते .

राज्यात हिवाळ्यानं काढता पाय घेतला आणि उन्हाळा सुरु झाला. फेब्रुवारीपासूनच महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातच तापमानाचा आकडा वाढू लागला. मुंबईला तुलनेनं या उन्हाच्या ळा अधिकच तीव्रतेनं जाणवल्या. पण, गेल्या काही दिवसांपासून इथंही तापमानाच काहीसे चढ ऊतार पाहायला मिळत आहेत.

दिवसभर ढगाळ वातावरण, दुपारच्या वेळी तीव्र होणारा सूर्यप्रकाश आणि त्यामुळं जाणवणारा उकाडा ही सर्व परिस्थिती पाहता सध्या मुंबईकर या हवामान बदलांमुळं बेजार झाले आहेत.मुंबईत आज सकाळपासूनच काही भागात पाऊस सुरू झाला आहे.

पश्चिम उपनगरात बोरिवली, दहिसर परिसरात सकाळपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. तर ठाणे जिल्ह्यातही बदलापूर, अंबरनाथ भागात पहाटेपासून पाऊस सुरू आहे. अवकाळी पावसामुळे (Rain) ऑफिसला जाणा-यांची तारांबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत ढगाळ हवामान आहे. मात्र आज सकाळपासून काही भागात पाऊस सुरू आहे. दादर परळ परिसरात ढगाळ हवामान आहे.

मुख्य म्हणजे महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या अवकाळी पावसाचे पडसाद या शहरावरही दिसून येऊ लागले आहेत. सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तिन्ही दिवसांना मुंबई शहर आणि उपनगरातील काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली. हवामान विभागाच्या माहितीनुसार काही भागांमध्ये ढगांचा गडगडाटही झाला. पण, पावसाचं प्रमाण इतकं कमी होतं, की ते कोणत्याही परिमाणात मोजणंही अशक्य होतं

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म