Aadhaar Card : आधारकार्डाबाबत अतिशय महत्त्वाची बातमी; जाणून घ्या ?

देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी आधारकार्ड (Aadhaar Card) हा विश्वसनीय आणि महत्त्वाचा ओळखीचा पुरावा समजला जातो. आधार केंद्रांवर नवीन आधार काढण्यासह कार्डावरील छायाचित्र, पत्ता, नावातील बदल करण्याचे काम केले जाते. मोबाईल क्रमांक आधारकार्डला लिंक  करणे, तर, आधारकार्ड हे पॅन कार्ड आणि बॅंक खात्याशीही लिंक करणे आवश्यक आहे.

यासोबतच आता आधार कार्डला दहा वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींना ते अद्ययावत  करून घेण्याबाबत मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये  राज्यात पुणे,  मुंबई  आणि ठाणे जिल्ह्यात ही मोहीम सुरू करण्यात आली असून केंद्रचालकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

तुमच्या आधार कार्डला (Aadhaar Card) दहा वर्षे झाली असतील तर आधार केंद्रात जाऊन ते अद्ययावत करावे लागणार आहे. पत्ता बदलला असल्यास नवीन पत्त्याचा पुरावा द्यावा लागेल. तसेच, त्यात बदल झाला नसला तरी पडताळणीसाठी सध्याचा पत्ता आधार केंद्रात  द्यावा लागणार आहे.

ही बाब ऐच्छिक आहे. मात्र, आधार कार्ड अपडेट झाल्यास संबंधित व्यक्ती त्याच पत्त्यावर राहत असल्याचे स्पष्ट होणार आहे. शिवाय, बॅंक खात्यासह आणि सरकारी अनुदान योजनांसाठी ई-केवायसी  करणे सोपे जाणार आहे.

नवीन आधार कार्ड (Aadhaar Card) काढण्यासाठी शुल्क आकारले जात नाही. अर्जदाराचा पासपोर्ट,  पॅन कार्ड,  रेशन कार्ड,  मतदार ओळखपत्र, चालक परवाना यापैकी एक पुरावा जोडणे आवश्यक आहे. वयाच्या पाच वर्षांपर्यंत जन्म प्रमाणपत्र. शालेय विद्यार्थ्यांसाठी बोनाफाइड . तसेच, कोणतीही कागदपत्रे नसल्यास ‘ॲनेक्झर ए’  अर्जाची सुविधा असणे गरजेचे आहे.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म