Sunday, June 22, 2025

ganpati संकष्ट चतुर्थी दिवशी कोणाच्याच हातून घडू नयेत अशा गोष्टी; उपासनेत घ्या ही काळजी

आज अनेक माता आपल्या मुलांच्या सुखी आणि सुरक्षित आयुष्यासाठी अंगारक संकष्ट चतुर्थी व्रत पाळतात. या दिवशी गणेशाची (ganpati) पूजा करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच या दिवशी काय करू नये, हे देखील महत्त्वाचे आहे. अजानतेपणे कधी-कधी आपण अशा गोष्टी करतो, ज्यामुळे व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांच्याकडून जाणून घेऊया अंगारक चतुर्थीच्या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत.

अंगारक चतुर्थीला काय करू नये –

  1. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी पूजेच्या वेळी वामावर्ती म्हणजेच ज्या गणेशमूर्तीची सोंड डावीकडे वळलेली असेल तिची पूजा करावी. या प्रकारच्या गणेशाच्या पूजेचे नियम कठोर नसतात, सर्वसाधारण पूजा-विधी हा गणेश सहज प्रसन्न होतो आणि साध्या पद्धतीने त्याची पूजा केली जाऊ शकते.
  2. दक्षिणावर्ती सोंडेच्या गणपतीची (ganpati) स्थापना केल्यास सामान्य माणसाला त्याची पूजा करणे कठीण जाते. त्यात तुम्हाला पूजेचे सर्व विधी पाळावे लागतात. ही पूजा एखाद्या पंडितजींकडून पूर्ण विधीपूर्वक करून घ्यावी लागेल.
  3. शुभ कार्यात लाल, केशरी, हिरवा, पिवळा रंग नेहमी वापरतात. या दिवशी मातांनी या रंगांचे कपडे वापरावेत. काळे कपडे घालू नका. चतुर्थीसाठी काळा रंग अशुभ मानला जातो.

    हे वाचा : महाराष्ट्रात थंडीची लाट; हवमानान खातं म्हणतंय ‘इथं’ येणार पाऊस पाहा

  4.  गणेशाची पूजा केल्यानंतर चंद्राची पूजा करावी लागते. आज रात्री चंद्राला अर्घ्य अर्पण करूनच उपवास सोडावा. त्याशिवाय उपवास पूर्ण होणार नाही. अर्घ्य देताना पाण्याचे शिंतोडे पायावर पडणार नाहीत, हेही ध्यानात ठेवावे.
  5.  गणेशाच्या पूजेमध्ये तुळशीचा समावेश अजिबात करू नये.
  6.  ज्या मातांना आरोग्यासंबंधी समस्या आहेत त्यांनी निर्जल उपवास करू नये. तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे व्रत घरातील इतर कोणाकडून करून घेऊ शकता.

संकष्टीला घरातील सदस्यांनी काय करू नये –

  1. जर तुमच्या घरी अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रत ठेवले जात असेल, तर या दिवशी तामसिक भोजन करू नये. म्हणजे लसूण, कांदा इत्यादींचे सेवन करू नये.
  2. अंगारक चतुर्थीला घरातील मुलांनी लक्षात ठेवावे की, आपल्या आईचे व्रत त्यांच्या कोणत्याही कामामुळे अपूर्ण राहू नये.
  3. गणेशाचे (ganpati) वाहन उंदीर आहे. अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास देऊ नका. असे केल्याने गणेशजींना राग येतो, असे मानले जाते.
Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म