राजकोट: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी (Cricket) सामना अत्यंत रोमांचक बनला आहे. दुसऱ्या दिवशी अश्विनने इंग्लंडची सलामी जोडी बाद करत कसोटी क्रिकेटमधील 500 विकेट घेण्याचा विक्रम केला. मात्र, काही तासानंतरच अश्विनने तिसऱ्या कसोटीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कौटुंबिक कारणामुळे अश्विन चेन्नईला परतला
कौटुंबिक कारणामुळे तिसरा कसोटी सामना अर्ध्यावर सोडून अश्विन चेन्नईला परतला आहे. राजकोट कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात 445 धावांचा डोंगर उभारला. इंग्लंडनेही दमदार प्रत्युत्तर देत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताना दोन बाद 207 धावा केल्या आहेत. इंग्लंड अजूनही 238 धावांनी मागे आहे.
अश्विनच्या माघारीमुळे भारतीय संघाला मोठा धक्का
महत्त्वाच्या क्षणी अश्विन नसल्यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का (Cricket) बसला आहे. आता भारतीय संघाकडे फक्त चार गोलंदाजांचा पर्याय उपलब्ध आहे. रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांना फिरकीची जबाबदारी सांभाळावी लागेल, तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यावर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असेल. याशिवाय, यशस्वी जायस्वाल हा पर्यायही रोहित शर्माकडे उपलब्ध आहे. तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा कोणती रणनीती आखतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अश्विन कौटुंबिक एमेरजन्सीमुळे घरी परतला
बीसीसीआयनं मध्यरात्री ट्वीट करत अश्विनच्या माघारीची माहिती दिली. बीसीसीआयने सांगितले की, अश्विन कौटुंबिक एमेरजन्सीमुळे सामना अर्ध्यावर सोडून घरी परतला आहे. या कठीण परिस्थितीमध्ये बीसीसीआय आणि खेळाडू अश्विनसोबत आहेत आणि गरज भासल्यास त्याला सर्वतोपरी मदत केली जाईल.
R Ashwin withdraws from the 3rd India-England Test due to family emergency.
In these challenging times, the Board of Control for Cricket in India (BCCI) and the team fully supports Ashwin.https://t.co/U2E19OfkGR
— BCCI (@BCCI) February 16, 2024
500 वी विकेट वडिलांना समर्पित
राजकोट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी अश्विनने इंग्लंडचा (Cricket) सलामी फलंदाज जॅक क्राउलीला बाद करत कसोटी क्रिकेटमधील 500 विकेट पूर्ण केल्या. या खास विक्रमानंतर अश्विन भावनिक झाला होता आणि त्याने आपली 500 वी विकेट आपल्या वडिलांना समर्पित केली. त्याने सांगितले की, वडील प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये त्याच्यासोबत उभे राहिले होते.
हे वाचा : मोबाइल मध्ये अॅप्स कसे लपवायचे? पाहा सोपी पद्धत