बॉर्डर गावस्कर (Cricket) ट्रॉफीतील अखेरच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात पहिल्या तासाभरात ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीने संयमी खेळ केला. मात्र ड्रिक्स ब्रेकनंतर भारताचा फिरकीपटू अश्विनने पहिली विकेट घेतली. तर दुसरा धक्का मोहम्मद शमीने दिला.
यात रोहित शर्माने गोलंदीजत बदल करण्याची ट्रिक भारताच्या कामी आली.भारताने आजच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल करत मोहम्मद सिराजच्या जागी मोहम्मद शमीला संघात घेतलं. सहाव्या षटकात ट्रेविस हेडचा सोपा झेल विकेटकीपर केएस भरतने सोडला.
दरम्यान, वेगवान गोलंदाजीवर हेड आणि उस्मान ख्वाजा धावा करत असल्यानं रोहितने (Cricket) फिरकीपटू अश्विनकडे चेंडू सोपवला. ड्रिंक्स ब्रेकनंतर अश्विनने भारताला पहिली विकेट मिळवून दिली. त्याने ट्रेविस हेडला जडेजाकरवी झेलबाद केलं. हेडने ४४ चेंडूत ३२ धावा केल्या. ख्वाजासोबत ६१ धावांची भागिदारीही केली.
हे वाचा : शेअर बाजारात पैसे लावणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, हा नियम बदलला, जाणून घ्या
हेड बाद झाल्यानंतर उस्मान ख्वाजा आणि मार्नस लॅब्युशेन यांची जोडी जम बसण्याआधीच मोहम्मद शमीने फोडली. तेव्हाही रोहित शर्माने फिरकी गोलंदाजीत बदल करत वेगवान गोलंदाज शमीच्या हातात चेंडू सोपवला. त्याने चौथ्या चेंडूवर लॅब्युशेनचा त्रिफळा उडवला. तो फक्त ३ धावांवर बाद झाला.
लंचनंतर ऑस्ट्रेलियाच्या ३५ षटकात २ बाद ९४ धावा झाल्या होत्या. उस्मान ख्वाजा ११३ चेंडूत ४० धावांवर तर कर्णधार स्मिथ ३३ चेंडूत ८ धावांवर खेळत होते.