Sunday, June 22, 2025

फोन Restart करणे चांगले की Power Off? 99% लोकांना माहित नसलेले ‘सीक्रेट’ उघड करून टाकूया!

दिवसेंदिवस फोनचा  (Restart ) वापर   वाढत चालला आहे आणि आता लोक अनेक लहान-मोठी कामं त्यावर करतात. फोन नवीन असला की तो वापरायला खूप मजा येते; पण जसजसा तो जुना होऊ लागतो तसतशा त्यात अनेक समस्या निर्माण होऊ  लागतात. बऱ्याच वेळा फोनमध्ये अशा काही अडचणी निर्माण होतात कि ज्यामुळे फोन फ्रीज होतो.

मग आपण ताबडतोब मोबाईल बंद करतो जेणेकरून आपण तो पुन्हा चालू केल्यावर तो नीट काम करेल. फोनमध्ये पॉवर ऑफ आणि रिस्टार्ट हे दोन पर्याय दिलेले असतात. Shut Down केल्याने फोन बंद होतो आणि आपल्याला तो पुन्हा ऑन करावा लागतो. Restart केल्यावर फोन बंद होऊन आपोआप चालू होतो.

तुम्ही कधी विचार केला आहे का, की दोन्हींचं काम सारखंच आहे. मग दोन ऑप्शन का दिले आहेत आणि या दोन्हींमुळे फोनमध्ये काय होतं. फोन दर आठवड्याला रिस्टार्ट केल्याने मेमरी लीक होण्यापासून रोखण्यात मदत होते. बॅटरीज प्लसने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमध्ये असं म्हटलंय, की जेव्हा ॲपला काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेमरीची गरज असते; पण जेव्हा अॅप वापरत नाही तेव्हा ती मेमरी मोकळी होती आणि मग ती लीक होते.

तुमचा फोन रिस्टार्ट केल्याने कनेक्टिव्हिटीत येणाऱ्या समस्यांमध्ये मदत होऊ शकते. जुने स्मार्टफोन कधीकधी Data आणि Wi-FI शी कनेक्ट होत नाहीत. त्यामुळे फोन Restart केल्यानंतर पुन्हा कनेक्ट करावा लागेल. तुम्ही फोन पॉवर ऑफ केल्याने त्यातला Cache  साफ करण्यात मदत होईल, जेणेकरून तुमचा फोन अधिक चांगल्या पद्धतीने ऑपरेट करू शकेल.

फोन शटडाउन आणि रिस्टार्ट करण्याव्यतिरिक्त तुम्ही फोनच्या बॅकग्राउंडमध्ये चालू असलेले ॲप्स क्लिअर करत राहायला पाहिजे. यामुळे फोन चालू असताना बॅटरीच्या हेल्थवर दबाव पडू शकतो.फोन रिस्टार्ट करणं सहसा तेव्हा चांगलं असतं जेव्हा फोन हँग होतो, ॲप्स नीट चालत नाहीत आणि सॉफ्टवेअरमध्ये गडबड होते. फोन रिस्टार्ट करणं ही चांगली प्रॅक्टिस आहे. त्यामुळे फोन सुरळीत चालतो.

Smart India
Smart India
Smart India is a Professional News Platform. Here we will provide you with only interesting content, which you will like very much.We're dedicated to providing you the best of News, with a focus on dependability and Daily Update.

हे वाचा

राशी भविष्य

अध्यात्म